बंद

    यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना

    • तारीख : 01/01/2025 -

    घरकुल योजना

    लाभार्थी

    1. लाभार्थी विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गातील असावा.
    2. लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रु.1.20 लाखापेक्षा कमी असल्याचे सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले उत्पन्नाचे प्रमाणपत्र,
    3. अल्पभूधारक किंवा भूमीहीन असल्याबाबत सक्षम प्राधिकाऱ्याचे प्रमाणपत्र,
    4. महाराष्ट्र राज्यातील वास्तव्याबाबतचे अधिवास प्रमाणपत्र,
    5. कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीने महाराष्ट्र राज्यात इतर कोणत्याही ठिकाणी घरकुल योजनेचा लाभ घेतला नसल्याबाबतचे शपथपत्र.
    6. ज्या लाभार्थ्यांकडे घरकुल बांधकामाकरीता स्वत:ची जागा आहे, असे लाभार्थी केवळ वैयक्तिक लाभास पात्र आहेत व ज्या लाभार्थ्यांकडे घरकुल बांधकामाकरीता स्वत:ची जागा नाही ते सामुहिकरित्या योजनेच्या लाभास पात्र आहेत.

    लाभ

    1. ग्रामीण भागातील विमुक्त जाती भटक्या जमाती प्रवर्गातील बेघर व भूमीहीन कुटुंबांसाठी शासकीय जमीन किंवा शासकीय जमीन उपलब्ध नसल्यास खाजगी जमीनीची खरेदी करुन त्यावर वसाहत उभारली जाते. दरहू योजनेंतर्गत 10 कुटुंबांच्या सामुहिक वसाहतीतील घरकुल बांधण्यास आणि सदरहू वसाहतीस पाणीपुरवठा, वीजपुरवठा, सेफ्टीक टँक, गटारासह अंतर्गत रस्ते, समाजमंदिर इ.पायाभूत सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी प्रति वसाहत रु.44.31 लक्ष इतका निधी उपलब्ध करुन देण्यात येतो.
    2. या योजनेंतर्गत सर्वसाधारण क्षेत्रासाठी प्रति घरकुल रु.1.20 लक्ष व डोंगराळ/दुर्गम भागासाठी प्रति घरकुल रु.1.30 लक्ष निधी उपलब्ध करुन दिला जातो.
    3. सदरहू योजनेंतर्गत घरकुलासाठी पात्र लाभार्थ्यांमध्ये पुढील घटकांना प्राधान्य देण्यात येते-
    • पालात राहणारे,
    • दारिद्र्य रेषेखालील कुटूंब,
    • विधवा, परित्यक्त्या किंवा अपंग महिला,
    • पूरग्रस्त क्षेत्र
    • विधवा/ विधुर/ अपंग/ अनाथ/ परितक्त्या/ वयोवृद्ध

    लाभार्थी:

    वर नमूद केल्याप्रमाणे

    फायदे:

    वर नमूद केल्याप्रमाणे

    अर्ज कसा करावा

    संबंधित जिल्ह्याचे सहायक संचालक , इतर मागास बहुजन कल्याण विभाग